गुरुवार, ३ मार्च, २०११

जीवन म्हणजे ....

जीवन म्हणजे संघर्ष
कधीच नसतो
जीवन म्हणजे नदीचा
प्रवाह असतो.....
ज्याला ओढ असते
वळणांची
ज्याला ओढ असते
ध्येयांची...!!

आई..

’आई’ असते पहिला गुरु
सारया जगताचीच ती ’कल्पतरु’..

ओल्या मातीच्या गोळ्याला आकार ती देते
तिच्या बिलाची पावती सदैव रिकामीच असते

आयुष्याच्या अखेरही मुखी नाव असते
’आई’ हेच ते अतुलनिय नाम असते

’आ’ म्हणजे ’आत्मा’,’ई’ म्हणजे ’ईश्वर’..
मातेचा विजय असतो सृष्टीच्याही अखेर...!!

मी शोधली आहे

आज जखमेवर माझ्या मीच मलम लावू लागली
गतकाळाला माझ्या कोपरयातून पाहू लागली
वाटत होती पहाडाएवडी ती गोष्ट आज निष्फळ ठरली
उगाचच दु:खाला मी चघळत राहीली
.
.
.
मग खिडकीतून तिरीप उन्हाची नकळत बिलगून गेली
रात्र सारी जागून काढली तेव्हा जाणीव झाली
रातीसोबत गतकाळालाही मागे सोडलं मग
कोंब फुटून ’आशेनं’ नव्याने धरीला तग...
आकांक्षांच्या पंखांना आता बळ दिलं
’उडूया नव्याने’ मनाला आव्हान केलं
.
.
जखमेवरही आता खपली धरली आहे
माझ्यातल्या ’मला’ मी शोधली आहे

सुरुवात :एक अभंग

विसरले आहे
कालचे मी सर्व
सुरु नवे पर्व
केले आता ॥१॥

आकांक्षांच्या पंखा
दिली नवी दिशा
मनी आता आशा
जिंकण्याची ॥२॥

मार्गात आलेले
झेलेणं हरणं
पेलेणं जिंकण
स्थितप्रज्ञी ॥३॥

जिवीत ध्येयाची
जिद्द आहे उरी
अपयश जरी
झेललेले ॥४॥

एक नवा सुर्य
उगवतो आहे
माझ्याकडे पाहे
आशेतुन ॥५॥

तेजोमय रुप
घेतले ते आत
पसरुनी हात
स्वयंस्फूर्ते ॥६॥

माय मरतेय

रस्त्यांवरुन,कार्यालयांतुन..
राजधानी मुंबईतुन..
रोजच मी पाहतेय....
’मायमराठी’क्षणोक्षणी मरतेय...!!


’सर्व शिक्षा अभियान’झाले दिल्लीत
’शिक्षा’चे’शिक्षण’ न केले मुंबईत
ईमान राखीत दिल्लीशी
’शिक्षाच’गेली खेड्यापाड्यात
सांगा खरच ’मराठी’ टिकतेय....?
लोकहो.. माय माझी रोज मरतेय...!!


मुख्यमंत्री होताच
’मुंबई’ चे ’बंबई’ केले
अवघ्या नांदेडात मग
’मराठी’ बोलणे कठीण झाले


पाटी विमानतळावरची हिंदीत पाहीली
’मराठीबाण्याने’चौकशीस मी धजली
’निकास’ म्हणजे ’बाहेर’ नि
’पूछताच’ हिच ’चौकशी’...
हिच तर मराठी म्हणून ’जनता’मला हसली


’पिवळे ते सोने नसते....
देवनागरीतले सारे मराठी नसते’...
कळण्यास खुप उशीर होतोय..
तोवर मायेचा लचका कुठेतरी तुटतोय ...!!


खुर्च्यावाल्यांना नसेल मायेची फिकीर
माय सांगतेय तु सोडू नकोस धीर
...मी धीर नाही सोडलाय...
नाळ तिश्याशी जोडलाय...
वाचवायचा तिला जरी प्रयत्न करतेय....
रोज माय तरी कुढत कुढत जगतेय...!!


(श्रिपाद ब्रह्मानंद पांडे लिखीत ’लिपीसाधर्म्याआडून मराठीवर अविरत वार’ लेखावर आधारीत(दिनांक:५/१/२०१०))

कळी फुलली......

एक होती कळी
खोलत नव्हती पाकळी
जाऊन तिच्या जवळी
म्हटले तिला खुळी

कळी हलकेच हिरमुसली
मग कहानी सांगू लागली
"किरणास आजवर न बिलगली
भ्रमरासोबत कधी न गुणगुणली
फुलण्याची आशा मनीच कोमेजली"
.
.
तिला म्हटले "अग खुळे
निट उघड डोळे
नि बघ जग वेगळे
तुझ्याहूनही दु:खी सगळे
तरी फुलवी सुंदर मळे
जगण्याचे तंत्र त्यांस कळे"
.
.
पाहुन तिच्याकडे पुन्हा हसले
तुझ्यासारखी मुङ होते म्हटले
’फुलण्याचे’ कर्तव्य उमगले
भ्रमराचे वेड मग पळाले
.
.
कळीला जगण्याचे ’सारं’ समजले
तिचे शंकानिरसन झाले
हलकेच तिने अभिवादन केले
कळीला तेव्हा मी फुलताना पाहीले....!!

...................

क्षितीजावर टेकेल आभाळ
वाट ही पाहिली
सावली होशील माझी
साहिली कधि काहिली
जल नव्हे मृगजळ तू
तहानलेली राहिली
वळणावर आज पुन्हा
जाहली मी एकली
-----अपेक्षा चौधरी

रामशास्त्री पुन्हा अवतरतील का?

युगायुगातुन एकदा अवतार माझा होतो
कृष्णाच्या बोलण्याचा अर्थ आज पटतो

रामशस्त्रींना नाही झाले ३०० वर्षे अजुन
पुढिल १०००-२००० वर्षे मग न्याय राहील झोपून

’ईश’ लोपला आहे आजच्या ’न्यायाधिशात’
(न्याय+ईश)
शास्त्रीनंतर न्याय रडतो आहे अंधारात

तासभर आधी निवृत्तिच्या पदोन्नती होते
’पेन्शनच भारी लोणी’ आपसुक पदरी पडते

लाखात घेऊन जमीन ’कोणी’ करोडोंना विकतो
काळ्या कोटाखाली सहज भ्रष्टाचार झाकतो

तिथेही आहेत जी न्यायप्रिय माणसे
त्यांनाही जीवन हे झालेय नकोसे

खातेय शेत कुंपणच..तर जायचे कुणाकडे..?
न्यायदेवताच न्यायासाठी घालतेय हो साकडे..!!

न्यायाधिश झालाय केवळ ’शिक्षावादी-दंडाधिकारी’
संपलेत शास्त्री जो पेशव्यालाही दंड करी....!!

फुटेल का कधी पापाचा हा घडा ...?
शास्त्री अवतरतील का शिकवण्यास धडा..?


(कॅप्टन आनंद जयराम बोडस लिखीत ’हवे आहेत रामशास्त्री’ या सकाळमधील लेखावर आधारित)

एक इवलं पाऊल

एक इवलं पाऊल
माझ्या घरात पडलं
घर माझ हरकल
खळी पाडून हसलं

एक इवलं पाऊल
मिठीत शिरल
स्पर्शाने नि:स्वार्थ
तन-मन शहारल

एक इवलं पाऊल
खुदकन हसल
पाहून सांगू कशी
किती मन आनंदल

एक इवलं पाऊल
दुडूदुडू धावल
घराला मझ्या
गोकुळ बनवून गेल

एक इवलं पाऊल
’मावशी’ म्हटल
तेव्हा खरच मन
पाखरु-पाखरु झालं

एक इवलं पाऊल
सर्वस्व बनल
नजरेत त्याच्या
जग माझ दिसल

एक इवलं पाऊल
सुख देऊन गेलं
दु:खाला त्याने
पळवून लावल....!!

दादा

’आई’ म्हणतात पहिल्यांदा
मी म्हटले ’दादा’..!!

सारयांच्या ’आखों का तारा’
आई-बाबांच्या नजरेतला ’हिरा’
सगळयांची काळजी घेणारा
सगळ्यात पहिला येणारा
हास्य पेरत जाणारा
माझा ’दादा’..!!


क्षणात आपलस करुन घेणारा
स्वत:च अस्तित्व असणारा
एक स्वाभिमान जपणारा
पण अहंकार नसणारा
हिंमतीवर जग जिंकणारा
माझा ’दादा’..!!


माझ्यावर जिवापाड प्रेम करणारा
भातुकलीत माझी साथ देणारा
कधी माझ्यासाठी खोट बोलणारा
ठेच मला लागल्यावर दुखावणारा
माझ्या जखमेवर हळुवार फुंकर घालणारा
माझा ’दादा’..!!


अलगद कोडी घालणारा
गणित चुकल्यावर ’धपाटा’ देणारा
मग शंकांची उकल करणारा
खुप खुप धम्माल करणारा
माझा ’दादा’..!!


त्या दिवशीही मी त्याची वाट पाहिली
दमुन मग झोपी गेली
रात्री फोनची घंटी वाजली
तो ठेवल्यावर आई ओक्साबोक्शी रडली
.
.

कधी नव्हे ते बाबाही रडले होते
काय झाल ..?मला काहिच कळले नव्हते

’दादा’ला घ्यायला बाबा,काका गेले होते
मी सार नुसतच पाहत होते
.
.

१ जानेवारी ,२००८ उजाडले होते
थंड दादाला घेऊन सारे ’परतले’ होते
जुन्या वर्षाने सोबत दादाला नेले होते
माझे ’चैतन्य’ हरवले होते
’दादा’ने मला एकटे सोडले होते ........
कायमचे....!!

थंडी ’ती’ नि ’ही’

आजी सांगायची....
म्हणे तिच्या लहानपणी
गोठवणारी थंडी असायची
जाड-जड वाकळ,शालीची
पांघरुन घ्यायची
वाफळणारया पाण्याने
आंघोळ करायची
आई तिची म्हणे
गुळ-खारकेचे लाडू बांधायची
संक्रांतीला मग
तिळांची चंगळ व्हायची
.
.
.
तशी आमच्या बालपणीही
थंडी बरयापैकी पडायची
पहाटेच मी ’बदामी’कडे वळायची
गरम दुधाच्या धारा अंगावर घ्यायची
’बदामी’ला नसेल का थंडी लागत
विचारून सारयांना भांडावून सोडायची
’मोत्या’साठी गोणींची गादी अंथरायची
नाक मुरडून खारकेचे लाडू खायची
.
.

मग मझ्यासोबत थंडीनेही रूप बदलत नेले
मी मात्र आजोळच्या थंडीच्या शोधात गुंतले
कधी माथेरान तर कधी शिमला गाठले
आजीच्या काढ्यांसाठी कधीच मुकले
.
.
.
आता खारकेच्या लाडवांना कुणीच विचारत नाही
’सायी’ची सर व्हॅसलीनला नाही
.
.
आज बस करीयची घाई
आला दिवस धावण्यात जाई
.
.
आताशा थंडीच पडत नाही
स्वेटरच गाठोड फडताळात राही
मग उगाच वाटत...
’यातल एखाद कार्व्हरला द्याव’......
फक्तच वाटत....
.
.
थंडीची थंडाई कमी झाली
कि कातडी गेंड्याची
की सारया निसर्गावर ’करणी’ मानवाची
विचारांच्या गर्दीत झोप हरवायची
संधीच निसटते मग थंडी अनुभवायची.....!!

शिक्षा ...

सोडून जाणार नाही तुला
तू म्हटल होतस
दोन जीवांच्या मला
मग एकट कस सोडलस...!!

चुक माझी नव्हती फक्त
आपली होती ती
क्षणिक जवलिक जास्त
कुमारिमाता बनली होती ...!!

जगाला भिउन पावुल
मागे घेतल काही
एक जीव मारल्याची
कट्यार काळजात राही...!!

सात पावल पडली
मी 'सौ' झाली होती
सार होती विसरली
नव्याने रंगल्या राती ...!!

घराण स्वप्न पाहिल
'गोकुळ' बनायाच
'गोल गोल पानी ' म्हणत
फेर धरून नाचायाच ...!!
.
.

पण विपरीत घडायच होत
भुतकालाने 'पत्र' धाडल होत
चुकीने 'शिक्षेच दान' दिल होत...!!
मला वांझोट केल होत
मला वांझोट केल होत ...!!

शंकेशिवाय .....इंजिनियर ....!!

मी म्हणजे एक 'query' आहे ..
बाकी 'लई' भारी आहे ...!!
म्हणे प्रत्येकात असतात काही गुण
माझ्यातले तेच लोकांवाटे अवगुण ....!!
लहान असताना आई कंटालायची
नंतर-नंतर शंकानिरसन टालायची .....!!
मग होते शाळेत गेले
तिकडे शिक्षकही कंतालले.....!!
colleजात सुधरेन म्हटल
तिथेही तेच 'अघटित' घडल ....!!
मग म्हटल आता काही करायला हव
सरयाना दाखवाव आपल 'रूप नव'....!!
CETत घासघास 'घासले'
नि झक्क marks आणले ....!!
.
.
medicalचा रस्ताच टाळला
उगा 'फीच'भुत मानगुटीवर कशाला ....!!
तसही तिथे खुप शंका आल्या असत्या ..
'Sr DOC'साठी ज्या चौकशा नुसत्या ...!!
गुपचुप enggचा फॉर्म भरला ..
पहिल्या CAPमध्येच नंबर लागला ....!!
झटपट admission घेतली
'पहिल्याच दिवशी ' हजेरी लावली ....!!
तिकडे होती मज्जाच मज्जा ..
raggingची भारी सजा ....!!
सार 'निपचित' पार पडल ..
lecture सोडून सर्व घडल ....!!
म्हटल आज नहीं तो 'कल कुछ होइल '..
काय माहीत(?) SEM अशीच जाइल....!!
इथे एक बर असत
नवापुरातेच sir फक्त ...!!
syllabus COVER झाला तरी
सार काही bouncer असत ....!!
कुणी फक्त attendance देतो
आम्ही मग proxy मारतो....!!
आता शंकाच येत नाहीत..
असतो फक्त 'self study'च्या घाईत....!!
आई म्हणते पोरगी बरी 'सुधारली'..
'शंका प्रेमातून 'सावरली .....!!
तिला कोण सांगणार ...(?)
"Enggला शंका वाचून काहीच अडत नसत ...
इकडे बस घोकून-घोकून इंजिनियर व्हायच असत "....!!


(माझ्या शंकांच निरसन होत नसल तरी तुमच्या होवो .....engg-engineering,sr.doc-senior doctor ,CAP-Centralised Admission Process,SEM-semister... 4 any doubt बेधड़क v4a).

प्रश्न तेच................

प्रश्न तोच 'कसाब'चे काय...?
उत्तर तेच 'शोध' सुरु हाय..!!

आहे 'ती' प्रगती....
की निव्वळ शरणागती.......?

कुणी सांगेल का ......
विकासाची ही कोणती गती.....?
की राजकारनाची नवी रीती .....!!

आम्ही असेच थंड राहणार .....
की पेटून काहीतरी करणार ......?

या आणि वार करा ...
आम्ही अहिंसेचेच पाइक होणार ......?
प्रश्न तेच ......सुरक्षेच काय ....?

मी प्रेमात पडली आहे !!

मी अलगद जवळ जाते ....
थोडस 'अंतर' कमी करते
नि..तासनतास गप्पा मारते

सांज उलटून रात्र होते...
मग घराकडे वलते

रात्री पुन्हा भेटते ...
आता मला झोप येत नसते ..
मग त्यांच्या 'मिठीची' चादर करते

अस गेले कित्येक दिवस चालू आहे
नि रोज़ नव्यानेच आमची भेट होत आहे

अताशा एकांत ही हवासा वाटतो
निदान तेव्हातरी आम्ही 'एकटे' असतो !!

उगाचच असलेली गर्दी नकोशी होवू लागली आहे
कशी कोण जाणे मी शब्दांच्या प्रेमात पडली आहे !!

एका क्षणात ....

त्या एका क्षणात
रडूनि हसले मीच माझे ..

त्या एका क्षणात
हरुनी जिंकले मीच माझे..

त्या एका क्षणात
भिजले सारे क्षण कधीचे ..

त्या एका क्षणात
जगले जगने मी कधीचे ...

आठवणी..

आठवणीची नि माझी
गट्टी फार आहे ..
दूर माणसे गेली
तरी त्यांना धार आहे ..

काही क्षण साथितले
तर... काही विरहातले..
तुझ्यासंगे अनुभवल्या
दुखाच्या सुखातले..!!
रंग उडून गेले ..
गंध विरून गेले..
मन हे ओथंबले
आज चिंब चिंब नाहले

आठवणीत रे डोळे भरून आले ....
तुझ्या आठवणीत रे डोळे भरून आले ....

मंगळवार, २२ फेब्रुवारी, २०११

............

जोरदार वादल उठत ...
दोघ-तिघ उध्वस्त होतात ...
बाकी त्यांच सांत्वन करतात ...
मग,कधीतरी वादल निवत ...
सर्व काही 'सुरलित' चालत ..
त्याच वाटेवर म्यरेथोन धावत ..
उध्वस्त डोळ्यातले आसू आटतात...
गडद अंधारात 'ते' धडपडतात ....
आता मात्र कुणालाच 'त्यांची' कालजी न्हाई...
कुणालाच मदतीची नाही घाई....
अशी वादल होत राहतात ...
होणारे उध्वस्त होतात ...
मंत्री आश्वासन देत राहतात...
निवडून आल्यावर सारेच..'सारेच' विसरतात ...

आठवणी..

आठवणींची न माझी
गट्टी फार आहे ..
दूर माणसे गेली
तरी त्यांना धार आहे ..

काही क्षण साथीतले
तर... काही विरहातले..
तुझ्यासंगे अनुभवल्या
दु:खाच्या सुखातले..!!
रंग उडून गेले ..
गंध विरून गेले..
मन हे ओथंबले
आज चिंब चिंब नाहले

आठवणीत रे डोळे भरून आले ....
तुझ्या आठवणीत रे डोळे भरून आले ....

स्त्रिसाठी

तुझा तुझा नि तुझाच....
होवून उरतो जेव्हा
गर्क असते तू दुसऱ्याच ...
कोणा कामात तेव्हा
पहाटेच्या पाचपासून रात्रीच्या अकराचा
तुझा ऑफिस टाइमच अजब वाटतो !!
स्वत:च्या 'या वेळासाठी'
कधी तुझ्यापाशी वेळच नसतो ...
तू पत्नीची आई होता
घर आनंदून जाते !!
गृहिणी होताच तुझ्यातल्या
स्त्रीलाच का विसरून जाते ?
स्वत:चाही कधीतरी वेगला
परिघ निवडून पहा
स्वच्छ आकाशात या
स्वच्छंदीपणे उड़त रहा
चिमणा पिल्ले निघून जाता ...
निराश तू होवू नकोस
खरंतर याच वेळी स्वत:साठी
जगुन तू बघ 'भरघोस' ...!!

सोमवार, २१ फेब्रुवारी, २०११

उंच आकाशी उडताना

(उंच आकाशी उडताना या ओळीवर लिहिलेली माझी कविता)












आई हात तुझा सोडताना,
डोळ्यांत अश्रू असताना,
शाळेची पायरी चढताना ,
वाटत होता एकटेपणा...
उंच आकाशी उडताना

माझ्यासाठी धडपडताना,
रात्र-रात्र जागताना,
बोचत होते माझ्या मना,
सार्थक याचे करावे
वाटत होते क्षणा-क्षणा,
उंच आकाशी उडताना

तुझं स्वप्न साकारताना,
एक-एक कसोटी उतरताना,
अर्पित होतो तना-मना
उतरवित होतो ...
माझ्यात मी तुझ्या स्वाभिमाना,
उंच आकाशी उडताना

तुझ्या संस्कारांकडे न केला डोळा काना,
आज अश्रू दाटे या नयना,
'आई' तुझ्या विना आज आहे उणा,
उंच आकाशी उडताना

काय चुकल होत....??

खरंच काय चुकलं होतं....??
खरंच कुणाचं चुकलं होतं....??
खरंच कधी चुकलं होत....??
मला खरंच माहीत नाही ....
पण त्या संवादाची जागा ..
असह्य अबोल्याने घेतली होती .....
प्रेम नव्हतेच कधी ..निदान मैत्री तरी होती !!
जागेपणात नाहीच कधी ...पण भेट स्वप्नात होत होती ..!!!
आता झोपच लागत नाही...मग स्वप्न कुठून पडणार ..??
माझ-तुझंच भिनलय...तर आपलं कधी होणार ..??
.
.

तू गेल्याने फरक पडणार नाही ...
कारण सारेच सोडून गेले ..!!
फक्त काही अश्रु नि ...आठवणी सहाव्या लागतील...
बाकी सारेच तू नेले ...!!
खरचं चुकलं कुठे नि कुणाच मला माहीत नाही ....
पण तुझी आठवण मी जगत राहीन ...!!
माझ्या शब्दांत तुला शोधत जाईल...
पण मला खरंच माहीत नाही काय चुकलं होतं ...??

वियोग

विझू लागतात कधी-कधी संदर्भांचे दिवे ..
तरी जाग्या झाल्या आठवणी ...
खोलवर पिलवतुन टाकतात विरहाच्या दुखाने ....
मग मागल्या आठवणी मी आठवू लागते ...
पण ....अर्ध्या अधिक कालाच्या ओघात भरकतल्या जातात ...
मग वियोगाच्या गर्तेत खोलवर जाताना ....
आसवाना "ही" करुन दिली जाते वाट ...
खोलवर रुतनारी ,ही भलभलनारि जखम घेवुन,
जगायला खरतर अश्वत्थाम्याकडूनच शिकायला हव होत........
अस आतून वाटत राहत ....
निर्माण झालेली ही "अर्थशुन्येतेची पोकळी" ,
का भरून येईल कधी ...??

नात

नात असत युगायुगाच...

रेशमी भावबंधनाच

तुटत नाही जन्मोजन्मी ...

नेहमी असतो आपण त्याचे ऋणी

नात निर्माण करत एक मायेच बंधन ..

मानस असतात दूर-दूर तरी हृदय करत वंदन !!

भेटी

भेटी विरत जातात ...

गाठी रुजत जातात ..

गंध पेरत पेरत ...

वारा धुंद करतात ..

पावलामागे हाच वारा ..

मनाला बेधुंद करतो .....

कोण्या एक कातरक्षणी ....

साद घालित येतो .......

ती

संध्याकाळी त्या प्रथम त्याला तिने पाहिले ..
मनविणेचे सुर मग कधी नव्हे ते छेडले ..
सुरानी तिच्याच ...तिच्यात त्याला गुंफले
'निजेला' डोळ्यांतुन स्वप्नानी 'त्या' चोरले
मग श्वासानी त्याच्यात तिने स्वताला बांधले
'मी'पणाचे मोती हळूच तेव्हा निखलले
संगमाला मग नदीने टाकली ती पावले !!
हिन्दोल्यावर एक सुरेख घरटे ते बांधले
सुख-दुःखाचे क्षण तिने पेटित त्या जपले
पापन्यातले ओझे गालावर सांडले !!
अर्ध्यावर जेव्हा जग त्याने सोडले
पदराने हळूच दुःख तिने ते लपवले
पाखरांचे घरटेही तिनेच सांधले
उंबरठ्यावर उभी ती ..पिलाला विचारले
गुन्हा काय माझा ?...म्हणून हाल जाहले !!

एकतर्फी प्रेम

मी सगळ्यात सुखी कारण....
मी कमी दुखी.........
माझ दुःख एकच...... "एकतर्फी प्रेम"

मझ्याकडूनच फक्त ते...... म्हणुन एकतर्फी ते.....
ते विसरल की.... मात्र मी खुप सुखी...!!!

गर्दीत त्याला पहिल्यांदा पाहिले...
नि घोळक्यात त्याला मीही दिसले...
माणुस आपल हेच.... माझ्या नजरेने हेरले
सोबत यालाच द्यायची.....
मग मनाला पटले .....
म्हणुन मी एकतर्फी प्रेम केले ....

हलुहलु ...मैत्री होत गेली...
मग जवलिकहि वाढवत नेली....
प्रेमाची एक-एक पायरी मी चढत गेली.....
.....पण कधी त्याला नाही सांगितले.....
कारण मी एकतर्फी प्रेम केले ....


मी स्वप्नात रमले....
दिवस जात राहिले....
एके दिवशी....
त्याच्या लग्नाचे निमंत्रण मिळाले..
'साज' चढ़वून लग्नात मैत्रिण म्हणुन मिरवले....
कारण मी एकतर्फी प्रेम केले....


दोनाचे चार त्याचे झाले.....
वर्षात घराचे गोकुळ बनले....
मी मात्र एकतर्फी प्रेम केले....

सोबतीण त्याला सोडून गेली.....
'मैत्री' म्हणुन मी धावून गेली....
त्याच्या पिलाची आई नि घराची सुन झाले....
कारण मी एकतर्फी प्रेम केले .....


किनारयावर बसूनही तिष्टत राहिले.....
एक 'स्पर्शासाठी' तहानलेले ...
कारण मी एकतर्फी प्रेम केले ......!!!!

वीण तुझ्या माझ्या नात्याची उसवणार नाही कधीही

वीण तुझ्या माझ्या नात्याची उसवणार नाही कधीही "
(जर कुणाला कवी ठाऊकअसतील तर कृपया सांगावे )
या ओळीवर लिहिलेली माझी कविता


स्थिरावलेली ती नजर सांगते कधी मलाही...
तुझ्या इतकीच जाणीव आहे रे मलाही
पाहून तुला लिहिली पहिली ओळ आठवते आजही...
वीण तुझ्या माझ्या नात्याची उसवणार नाही कधीही

मिलनाचा गोडवा निराला म्हटल जरी कुणीही...
विरहाशीच प्रेम करू आपण दोघेही
नाहीच जमल तर स्वप्नात भेटू आजही!!
वीण तुझ्या माझ्या नात्याची उसवणार नाही कधीही

गहिवरून खरतर येत कधी मलाही ...
कातरवेली रडावस वाटत असेल तुलाही
व्यस्त बंधनात जरी तू आणि मीही ..
वीण तुझ्या माझ्या नात्याची उसवणार नाही कधीही

नेहमीच उन नसत ..दिवस जातील हेही
अंगनातल चांदन पाहशील तेव्हा तुही ...
शब्दांसंगे एकच असतील जेव्हा सुरही
वीन तुझ्या माझ्या नात्याची उसवणार नाही कधीही !!

कविता

संसाराच्या पसारयात या असच असत जगायच
रडता रडता हसायच
नि हसता हसता हसवायच
संसाराच्या पसारयात या असच असत जगायच ...

धाप लागेल म्हणुन नसत कधी थामबयाच
लागेपर्यंत धाप नसतच कधी धावायच
संसाराच्या पसारयात या असच असत जगायच ...

गर्दीतही एकटे अगदी
नि दुखातही आनंदी
संसाराच्या पसारयात या असच असत जगायच ...

अहंकाराच्या धुक्यात नसतच हरवायच
या इथे स्वतास स्वताला सावरायच
कधी कुणाचा आधार बनायच
मग आशेने आधाराच्या नाही थामबयाच
संसाराच्या पसारयात या असच असत जगायच ...

भरारी घेताना मातीला धरायच
स्वप्न नि ध्येय यातल अन्तर मापायच
उंच जीतक ध्येय तितक दूर चालायच
नाही साधल म्हणुन नसतच खचायाच
संसाराच्या पसारयात या असच असत जगायच ...

फिनिक्स बनुन राखेतून नवी झेप घ्यायची
बोथट झाल्या खडगेला धारदार करायची
संसाराच्या पसारयात या असच असत जगायच