गुरुवार, ३ मार्च, २०११

आठवणी..

आठवणीची नि माझी
गट्टी फार आहे ..
दूर माणसे गेली
तरी त्यांना धार आहे ..

काही क्षण साथितले
तर... काही विरहातले..
तुझ्यासंगे अनुभवल्या
दुखाच्या सुखातले..!!
रंग उडून गेले ..
गंध विरून गेले..
मन हे ओथंबले
आज चिंब चिंब नाहले

आठवणीत रे डोळे भरून आले ....
तुझ्या आठवणीत रे डोळे भरून आले ....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा