रस्त्यांवरुन,कार्यालयांतुन..
राजधानी मुंबईतुन..
रोजच मी पाहतेय....
’मायमराठी’क्षणोक्षणी मरतेय...!!
’सर्व शिक्षा अभियान’झाले दिल्लीत
’शिक्षा’चे’शिक्षण’ न केले मुंबईत
ईमान राखीत दिल्लीशी
’शिक्षाच’गेली खेड्यापाड्यात
सांगा खरच ’मराठी’ टिकतेय....?
लोकहो.. माय माझी रोज मरतेय...!!
मुख्यमंत्री होताच
’मुंबई’ चे ’बंबई’ केले
अवघ्या नांदेडात मग
’मराठी’ बोलणे कठीण झाले
पाटी विमानतळावरची हिंदीत पाहीली
’मराठीबाण्याने’चौकशीस मी धजली
’निकास’ म्हणजे ’बाहेर’ नि
’पूछताच’ हिच ’चौकशी’...
हिच तर मराठी म्हणून ’जनता’मला हसली
’पिवळे ते सोने नसते....
देवनागरीतले सारे मराठी नसते’...
कळण्यास खुप उशीर होतोय..
तोवर मायेचा लचका कुठेतरी तुटतोय ...!!
खुर्च्यावाल्यांना नसेल मायेची फिकीर
माय सांगतेय तु सोडू नकोस धीर
...मी धीर नाही सोडलाय...
नाळ तिश्याशी जोडलाय...
वाचवायचा तिला जरी प्रयत्न करतेय....
रोज माय तरी कुढत कुढत जगतेय...!!
(श्रिपाद ब्रह्मानंद पांडे लिखीत ’लिपीसाधर्म्याआडून मराठीवर अविरत वार’ लेखावर आधारीत(दिनांक:५/१/२०१०))
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा